अ ब ब..बारामतीच्या इतिहासात खूनप्रकरणी
न्यायालयाच्या निकालात मोठी शिक्षा; बारा जणांना जन्मठेप..
बारामती:-बारामतीच्या इतिहासात आजपर्यंत ऐवडी मोठी शिक्षा पाहली नाही, मात्र यावेळी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी खून खटल्यात एतिहासिक निकाल देत चार सख्खे भाऊ, तीन महिलांसह बारा जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली,याबाबत मिळालेली माहिती अशी की,दौंड येथील विनोद नरवार यांची 3 मे 2018 रोजी हत्या झाली होती. विनोद नरवाल त्यांच्या दुचाकीवरुन निघाले असताना संजीत जयप्रकाश टाक, सुजीत जयप्रकाश टाक,
रवि जयप्रकाश टाक, रणजित जयप्रकाश टाक, आकाश उर्फ छोटू दिपक बेहोत, नरेश प्रकाश वाल्मिकी, बबलू हिरालाल सरवान, सुरेश हिरालाल सरवान, मयुरी संजीत टाक, माधुरी सुजित टाक, शोभा किशोर वाल्मिकी, विकी
नरेश वाल्मिकी (सर्व रा. दौंड, जि. पुणे) व इतर अनोळखी लोकांनी तलवार, कोयता, लोखंडी पाईप, काठया,फरशीचे तुकडे, दगडांनी बेदम मारहाण केली. फिर्यादी व विनोद यांच्या पत्नी मीना नरवाल यांनी त्यांना वाचविण्याचा
प्रयत्न केला, मात्र दवाखान्यात नेताना त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी दौड पोलिसात बारा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरिक्षक गजानन जाधव यांनी केला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती एस. आर. पाटील यांच्या समोर हा खटला चालला.सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अँड. प्रसन्न जोशी यांनी काम पाहिले. आठ साक्षीदारांची साक्ष या खटल्यात महत्वाची ठरली.प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पुरावे व न्यायवैदयकीय पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने वरील बारा जणांना जन्मठेप व पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या दंडाची पाच लाखांची रक्कम मीना नरवाल यांना देण्याचेही आदेश न्यायालयाने दिलेले आहेत.
No comments:
Post a Comment