बायको हरवल्याचा केला बनाव; अशी त्याने खबर दिली..पोलिसांनी तपास करता खून झाल्याचं उघड झालं..
इंदापूर:- एक आगळ्या वेगळ्या घटनेत हरवल्याची खबर देण्याचा बनाव करून खून केल्याचं उघड झालं याबाबत सविस्तर हकीकत अशी की,इंदापूर तालुक्यातल्या कळाशी गावच्या नवऱ्याने पोलीस ठाण्यात येऊन सांगितलं, माझी
बायको हरवलीय! पोलिसांनी घटनेची नोंद
घेतली. तपास करता करता बऱ्याच गोष्टी
बाहेर आल्या! अत्यंत कौशल्याने तपास
करत पोलीस अखेर गावाला वळसा घालून
नवऱ्यापर्यंत पोहोचले.. नवऱ्याने जे
सांगितलं त्याने पोलीस देखील चक्रावले! आरोपी कितीही शातीर असला तरी
इंदापूरच्या पोलीस ठाण्यातला हा उघडकीस आलेला गुन्ह्याचा प्रकार चर्चेत आला,बायकोवर चारित्र्याचा संशय घेत तिचा
गळा आवळून तिच्या नवऱ्याने तिच्या हत्या
केली. त्यानंतर तिचा मृतदेह इंदापूर पासून अंदाजे तीनशे किलोमीटर पेक्षा जास्त
अंतरावर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील घाटात दीडशे फूट खोल
दरीत फेकून हा नवरा पोलिसांना
निर्विकारपणे आपली बायको हरवल्याचे
सांगत होता,या बाबत मिळालेली माहिती अशी की, सन 2013 सालापासून
पासून चितळकर वाडी येथील प्रियांका
शिवाजी चितळकर हिचा विवाह काळाशी
गावच्या ज्योतीराम करे याच्याशी झाला.
या दोघांचा संसार चांगला चालला. त्यांना
दोन मुले झाली. मग मात्र हळूहळू त्यांच्यात
खटके उडू लागले. ज्योतीराम ला मात्र
आपल्या बायकोचे कोणाशी तरी संबंध
असावेत असा संशय येत असल्याने मग
चारित्र्यावर संशय घेत दोघात वाद वाढू
लागला.यातच खरी सुरुवात झाली ती दि.
29 जानेवारी 2025 पासून ज्योतीराम करे
याने इंदापूर पोलिसांकडे एक खबर दिली
आणि त्यामध्ये आपली बायको हरवल्याची
नोंद केली. नेहमीप्रमाणे पोलिसांनी नोंद केली
असली, तरी काही गोष्टी संशयास्पद दिसू
लागल्याने ज्योतीरामच्या कौटुंबिक परिस्थितीची थोडीशी माहिती पोलिसांनी शोधली यामध्ये पोलिसांचा संशय बळावला.पोलिसांनी विचारलेली प्रश्न आणि त्यांची उत्तरे देता देता ज्योतीरामची बनवाबनवी उघड होऊ लागली,
प्रत्येक उत्तराला नवीन प्रश्न निर्माण होत
गेल्याने पोलिसांचा संशय वाढत गेला.
अखेर पोलिसांनी त्यालाच ताब्यात घेतले
आणि थेट चौकशीला सुरुवात केली.
मात्र ज्योतीरामने सांगितलेली माहिती धक्कादायक होती,ज्योतीरामला घेऊन त्यांनी नाशिकचा नांदगाव घाट गाठला. तिथे तब्बल दीडशे फूट खोल दरीत फेकलेला आणि
कुजलेला प्रियांका करे चा मृतदेहाचा
सांगाडा पोलिसांनी बाहेर काढला. या
घटनेत ज्योतिराम एकटाच नसावा, असा
पोलिसांचा संशय होता आणि त्यानुसार
घडलेही तसेच ज्योतिरामने मित्राच्या
मदतीने हा प्रकार केला होता. त्यामुळे
पोलिसांनी ज्योतीराम करे याच्यासह
दत्तात्रय गोलांडे यालाही ताब्यात घेतले यामध्ये या घडलेल्या घटनेचा उलघडा झाला आणि झालेल्या खुनाचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले.
No comments:
Post a Comment