बारामतीत सावकारी पुन्हा वाढलीय, कुणाची घेतली जातेय दखल तर कुणाची नाही? उडवंडी तील सावकारावर गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 1, 2021

बारामतीत सावकारी पुन्हा वाढलीय, कुणाची घेतली जातेय दखल तर कुणाची नाही? उडवंडी तील सावकारावर गुन्हा दाखल..

बारामतीत सावकारी पुन्हा वाढलीय, कुणाची घेतली जातेय दखल तर कुणाची नाही? उडवंडी तील सावकारावर गुन्हा दाखल..                                                                            बारामती तालुक्यातील एका गावात गरीब शेतकऱ्यांची व्याजाच्या पैशापायी मुदत खरेदीखत करून केली फसवणूक...लवकरच वाचा.!                                                          बारामती:- बारामती तालुक्यात व शहरात सावकारी वाढल्याचे अनेक प्रसिध्द झालेल्या बातम्या वरून लक्षात आले असेल, तर सावकारी च्या तक्रारी झाल्या असूनही अद्याप त्यांना न्याय मिळाला नसल्याने त्यांची दखल घेतली नसल्याने त्याच्या बातम्या आल्या नाही, असे कितीतरी शेतकरी,कर्जदार पीडित या आशेने वाट पाहतोय की माझी दखल घेतली जाईल पण धनदांडगे सावकाराच्या धाकट शाहीला घाबरून जीविताला धोका होईल या भीतीपोटी अजूनही दबलेला आहे व्याजाच्या पैशापायी अनेकांनी आत्महत्या केल्या तर कुणी प्रयत्न केला तर काही प्रमाणात पोलीस अधिकारी यांनी दखल घेऊन जमिनी परत मिळवूनही दिल्या, असे अनेक प्रकरणे आहे जिथे न्याय मिळाला तर कुठे नाही, अशीच एक प्रकरण तालुक्यातील एका गावात घडली, व्याजाने दिलेल्या पैशाच्या बदल्यात जमीन नावावर करून घेतली. ती परस्पर अन्य व्यक्तीला विकत फसवणूक केल्याचा प्रकार उंडवडी (ता.बारामती, जि. पुणे) येथे घडला.याप्रकरणी तिघांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फसवणुकीसह सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. शरद ज्ञानदेव तावरे (रा. उंडवडी, ता. बारामती),शहाजी मुरलीधर पवार (रा. सोनवडी सुपे) व भारत निवृत्ती भापकर (रा. कारखेल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विजय बाळासो गवळी (रा.उंडवडी) यांनी याबाबत फिर्याद दिली. फिर्यादींना २०१४ मध्ये पैशाची गरज होती. पत्नीचा मानलेला भाऊ शरद तावरे यांच्याकडे त्यांनी मागणी केली. त्यानुसार, तावरे यांच्याकडून दीड लाख रुपये १० टक्के व्याज दराने दोन महिन्यांच्या बोलीवर घेण्यात आले होते. परंतु दोन महिन्यात पैसे देणे फि्यादीला शक्य झाले नाही. दुसरीकडून तावरे यांचा पैशासाठी तगादा सुरु होता.त्यानंतर मार्च २०१५ मध्ये तावरे हे शहाजी पवार यांना
घेवून फिर्यादीकडे गेले. तुमची एक एकर शेतजमिन मुदत खरेदीखताने द्या. तुम्हाला सात लाख रुपये चार टक्के व्याजदराने दोन वर्षांसाठी दिले जातील. असा प्रस्ताव त्यांनी दिला.त्यानुसार फिर्यादी हे केडगाव येथे दस्त करण्यासाठी गेले असताना या दोघांनी हा दस्त भारत भापकर यांच्या नावे केल्याचे दिसून आले. शिवाय मुदत खरेदीऐवजी थेट खरेदीखताचा उल्लेख दस्तावर होता. त्यामुळे फिर्यादी तेथून निघून आले.त्यानंतर या तिघांनी उंडवडी येथे फि्यादीची भेट घेतली.त्यावेळी फिर्यादीने थेट खरेदीखत कसे काय करता?अशी विचारणा केली. त्यावर तुम्हाला पैसे मिळण्याशी मतलब असे सांगत त्यांची समजतू घालण्यात आली.त्यानंतर ५ मार्च २०१५ रोजी खरेदीखत करण्यात आले.त्यापोटी मिळालेल्या रकमेतून तावरे यांनी दीड लाख रुपये व व्याजाची ८० हजारांची रक्कम काढून घेतली.३० हजार रुपये दस्तासाठी खर्च झाल्याचे सांगत ४ लाख ४० हजार रुपये फिर्यादीला दिले. त्यानंतर सहा महिन्यांनी या तिघांनी सात लाख रुपयांची मागणी फिर्यादीकडे केली. त्यावर दोन वर्षे मुदतीवर पैसे दिले आहेत. तुम्ही पैसे मागू नका असे फियादीने सांगितले.वारंवार त्यांच्याकडून तगादा लावला जावू लागला.भावकीतील संजय मनोहर गवळी यांच्या नावे विसारपावती करत त्यांच्याकडून साडे चार लाख रुपये थेट फिर्यादीने तावरे यांना ३ लाख ८० हजार रुपये दिले.त्यानंतर एक एकर जमीन परस्परच निलम राहूल किर्दत यांना विकण्यात आल्याची माहिती फिर्यादीला मिळाली.त्यांनी या तिघांकडे चौकशी केली.त्यानंतर सहा महिन्यात वारंवार पाठपुरावा करूनही जमिन परत दिली गेली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात
आल्यावर फिर्यादीने तक्रार दाखल केली.

No comments:

Post a Comment