गट-तट न करणारा,सर्वांना सोबत घेऊन चालणारा शहराध्यक्ष असावा,भाजपा कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे टोचले कान..
छत्रपती संभाजीनगर :- महाराष्ट्रातील मंडळाध्यक्षांची निवड झाल्यानंतर
आता भाजपाने आपले लक्ष शहराध्यक्षांच्या निवडीवर केंद्रित केले आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात
शहराध्यक्ष कसा असावा?या संदर्भात मार्गदर्शन करताना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे कान टोचले. पक्षासाठी वेळ देणारा, गट-तट न करणारा,
सर्वांना सोबत घेऊन चालणारा शहराध्यक्ष असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपण काही ठिकाणी मंडळ अध्यक्ष नियुक्त केले. आता जिल्हाध्यक्ष निवडायचा आहे. निश्चित केलेल्या प्रक्रिये प्रमाणे ही निवड होईल. (BJP) पक्षाला वेळ देणारा जिल्हाध्यक्ष असावा,गट-तट न करता सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा तो
असावा. तो तुम्हाला शोधायचा आहे, असे चव्हाण म्हणाले.तो नेता नसेल तरी चालेल पण पक्षासाठी प्रामाणिक काम करणारा असावा, अशी अपेक्षा चव्हाण यांनी बैठकीत
व्यक्त केली.लोकसभेत विरोधकांच्या फेक नॅरेटीव्हमुळे आपल्याला अपेक्षित यश मिळाले नाही. विधानसभा निवडणूकीत संघ
आणि समविचारी संघटनांनी, ठिकठिकाणी बैठका घेतल्या.सरकार का हवे? पटवून दिले. त्यानंतर आपल्याला विधानसभेत यश मिळाल्याचे चव्हाण म्हणाले. यावेळी रावसाहेब दानवे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment