बारामती:- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रावहिनी पवार यांनी अखेर सत्तेची सूत्रे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.आज संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार राज्याच्या
पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.मात्र, या निर्णयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास अत्यंत खडतर आणि भावनिक संघर्षाचा होता.अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रावहिनी पवार पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या. सार्वजनिक जीवनापेक्षा कुटुंबाला प्राधान्य देणाऱ्या सुनेत्रा वहिनींनी सुरुवातीला राजकारणात सक्रिय होण्यास आणि पद स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगाने हालचाली घडल्या.कुटुंबातील एकाकी झुंज ज्यावेळी अजितदादांनी बंड केले होते, तेव्हा संपूर्ण पवार कुटुंब एका बाजूला आणि दादा एकटे दुसऱ्या बाजूला होते.त्या कठीण काळात केवळ सुनेत्रावहिनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या.अस्तित्वाचा प्रश्न दादांनी अत्यंत परिश्रमाने उभा केलेला पक्ष आणि त्यांचे राजकीय वारसा टिकवणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचे पक्षातील नेत्यांनी त्यांना पटवून दिले.हे कारण असु शकते जर सुनेद्रा वहिनींनी जबाबदारी स्वीकारली नाही, तर अजितदादांनी पाहिलेली स्वप्ने अधुरी राहतील आणि पक्ष विखुरला जाईल,ही भावना त्यांच्या मनाला शिवली.पतीचे कष्ट वाया जाऊ नयेत,याच एका विचारातून त्यांनी जड अंतःकरणाने उपमुख्यमंत्री होण्यास संमती दिली.आज दुपारी २:०० वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठक झाली यात सुनेत्रावहिनी पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी अधिकृत निवड केली त्यानंतर संध्याकाळी ५:०० वाजता राजभवनावर राज्यपाल त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देतील. आज केवळ सुनेत्रावहिनी पवार यांचाच शपथविधी होणार आहे.
No comments:
Post a Comment