बापरे... शहरातून गायब होतायेत लोकांच्या बायका;तक्रारी वाढतच गेल्या... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 20, 2024

बापरे... शहरातून गायब होतायेत लोकांच्या बायका;तक्रारी वाढतच गेल्या...

बापरे... शहरातून गायब होतायेत लोकांच्या
 बायका;तक्रारी वाढतच गेल्या...
मुंबई :-नुकताच एक बातमी प्रसिद्ध झाली यामध्ये बायका गायब झाल्याची माहिती मिळाली  एक असं शहर जिथे लोकांच्या बायका हरवल्याच्या तक्रारी वाढतच गेल्या.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आता परिस्थिती अशी आहे की, शहरातील अवघ्या एका पोलीस ठाण्यात गेल्या 23 दिवसांत 14 हून अधिक व्यक्ती बेपत्ता
झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कुणाची पत्नी विमानतळावर जाण्यासाठी घरून निघाली
होती, पण ती विमानतळावर पोहोचलीच नाही, तर कुणाची पत्नी विमानतळावर पोहोचली पण अंतिम स्थळी पोहोचली नाही.या शहरातील एका पोलीस ठाण्यात जवळपास दर दीड दिवसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद झाली असून प्रत्येक घटना
धक्कादायक आहे. या सर्व तक्रारींवर स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवून बेपत्ता महिला आणि इतर लोकांचा शोध सुरू केला आहे. आता आम्ही तुम्हाला त्या शहराचं आणि पोलीस ठाण्याचं नाव सांगणार आहोत, जिथे
लोकांच्या बायका बेपत्ता होत आहेत. तर, या शहराचं नाव हैदराबाद आहे.
आम्ही ज्या पोलीस स्टेशनबद्दल बोलत आहोत, त्याचं नाव सायबराबाद पोलीस स्टेशन आहे. 17 एप्रिल 2024 ते 10 मे या कालावधीत या पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तींच्या 14 हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. हैद्राबादच्या सायबराबाद पोलिसांत दाखल
झालेल्या बेपत्ता प्रकरणांविषयी सविस्तर माहिती घेऊ एका वरिष्ठ विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कट्टा अंजनेयुलु राव नावाच्या व्यक्तीने सायबराबाद पोलीस स्टेशनमध्ये आपली 27 वर्षीय मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांनी सांगितलं होतं की, त्यांची मुलगी 4 मे 2024 रोजी रात्री
11.50 वाजता मलेशियाला रवाना होणार होती. रात्री तिने फ्लाईट उशिरा येत असल्याची माहिती दिली. पहाटे 5 वाजेपर्यंत वडील आणि मुलीमध्ये बोलणं झालं. त्यानंतर फोन बंद झाला. यानंतर ती ना मलेशियाला पोहोचली ना तिच्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध झाली.ही बाब 18 एप्रिल 2024 ची आहे. तारकानागा प्रामाणिक
यांनी सायबराबाद पोलीस ठाणं गाठून सायंकाळी सव्वा सहा वाजता पोलीस अधिकाऱ्यांकडे आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार केली. त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे की,त्यांची 22 वर्षीय पत्नी प्रिया प्रामाणिक फोनवर कोणाशी
तरी बोलत होती. या कारणावरून त्याचं पत्नीशी भांडण झालं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून घरी पोहोचले तेव्हा त्यांची पत्नी घरातून बेपत्ता होती. त्यांनी पत्नीचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती कुठेच सापडली नाही.ही बाब 19 एप्रिल 2024 ची आहे. मुन्नी मौलाबी नावाच्या
महिलेनं सायबराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि सांगितलं की, तिचा पती शेख रफी दुबईहून आपल्या मुलीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आला होता.लग्नानंतर, 15 एप्रिल 2024 रोजी ते त्यांच्या नांद्याला येथील घरातून हैदराबाद विमानतळावर निघाले, तेथून ते
सौदीला रवाना होणार होते. 16 एप्रिल रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास त्यांनी त्यांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीच्या नंबरवरून कॉल केला, त्यानंतर ते बेपत्ता झाले.अशी माहिती एका वृत्तपत्रा वरून समजली.

No comments:

Post a Comment